“दोन घास” उपक्रमाच्या शुभारंभाची बातमी. Thank you, Shashank Laware Dada.

“दोन घास” उपक्रमाच्या शुभारंभाची बातमी. Thank you, Shashank Laware Dada.


परवापासून आम्ही विथ आर्या (Withaarya) या संस्थेच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे दररोज संध्याकाळी 50 रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण (दोन घास) देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आणि याचा गरजू लोकांना चांगला उपयोग होत आहे, व होईल अशी आम्हाला आशा आहे.




Max Maharashtra, Max Woman यांनी आयोजीत केलेल्या “शिक्षणाचा रस्ता कुठपर्यंत पोहचला?” या चर्चासत्रात / panel discussion मध्ये आरती (सौ. आरती आमटे – नानकर) सहभागी झाली होती. छान चर्चा झाली. व हे चर्चासत्र खालील link वर उपलब्ध आहे.
काही updates.
आस्था प्रकल्पाबद्दल व आस्था भोजनालयाबद्दल –
प्रकल्पाचे व भोजनालयाचे काम व्यवस्थित व नियमीतपणे सुरू आहे. सध्या प्रकल्पात 1 वृध्द गृहस्थ राहत आहेत. इतरही काही जण प्रकल्पात रहायला येतो असे म्हणत आहेत पण वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या तरी प्रकल्पात हे काका एकटेच आहेत. व मागच्या महिन्यात आपण अमरावतीमधील जिल्हा सामान्य रूग्णालयातील (Irwin Hospital मधील) canteen ही चालवायला घेतले आहे, व आस्था भोजनालय तेथे shift केले आहे. आणि आमच्यासाठी ही जागा नवीन असल्यामुळे, घरापासून थोडी लांब आणि जास्त वर्दळीची असल्यामुळे, आणि खर्चही वाढल्यामुळे आम्हाला हे सर्व manage करायला थोडं अवघड होत आहे, पण तरीही काम व्यवस्थित व नियमीतपणे सुरू आहे.
मी हे परत व मुद्दाम हून सांगीतले कारण मागच्या 1-2 महिन्यात आम्हाला हे जाणवले, विशेष करून जाणवले, की काही जणांना (बहुतेक बऱ्याच जणांना) आम्ही हे भोजनालय का सुरू केले आहे, व आमची इतर कामे सोडून आम्ही ते का चालवत आहोत हे नीट लक्षात येत नाही. आणि काही जणांना (बहुतेक बऱ्याच जणांना) असेही वाटते की आम्ही फक्त हे भोजनालयच चालवतो. आमच्यावर प्रेम करणाऱ्या काही जणांनी आम्हाला तस स्पष्टपणे विचारलेही आहे की आम्ही हे भोजनालय का चालवतो? आता इतरांना काय वाटते याने आम्हाला फारसा फरक पडत नाही, पण कोणी स्पष्ट विचारले तर आम्ही उत्तर जरूर देतो. आणि असाच प्रश्न काही दिवसांपूर्वी आमच्या एका स्नेहींनी विचारल्यावर उदयने त्यांना जे उत्तर दिले ते त्यांनाही तर्कसंगत वाटले, पटले व ते थोडक्यात असे होते – हा काही आमचा व्यवसाय नाही. पण हे भोजनालय या प्रकल्पाचा अविभाज्य भाग आहे व हा प्रकल्प त्याशिवाय चांगल्या रीतीने सुरू राहू शकत नाही. आणि हा प्रकल्प सुरू रहावा, चांगल्या रीतीने सुरू रहावा असे आम्हाला वाटते म्हणून आम्ही हे भोजनालय चालवतो.
आमचा प्लॉट, त्यावरील घर व त्यातील प्रकल्पाची जागा –
कर्ज अजून मंजूर झालेले नाही आणि त्यामुळे बांधकामही अजून सुरू झाले नाही. सध्या कागदपत्रांची जुळवाजुळव व इतर प्रयत्न सुरू आहेत. व बांधकामही लवकरच सुरू होईल अशी आशा आहे.
इतर –
मागच्या 1-2 महिन्यात काही कौटुंबिक कार्यक्रमांमुळे जवळपास सगळ्याच मित्र मंडळी, नातेवाईक यांच्या बऱ्याच दिवसांनंतर भेटी झाल्या. छान वाटले. मला काही कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची, बोलण्याची, प्रकल्पाबद्दल सांगण्याची संधीही मिळाली. त्यामुळेही छान वाटले पण मी अधिक चांगल्या रीतीने बोलायला, मनातले विचार स्पष्टपणे मांडायला शिकले पाहिजे हेही जाणवले. त्यासाठी आता प्रयत्न करेल.
आणि सध्या इतर काही करायला फारसा वेळच मिळत नाही आहे. पण तरीही जमेल ते, व आवश्यक ते सुरूच आहे.
बाकी सगळे छान. नवीन वर्षासाठी परत एकदा शुभेच्छा.








27 व 28 तारखेला (27 – 28 November 2022) USHA, AFARM व आपल्या संस्थेने आयोजीत केलेला 2 दिवसांचा शिलाई प्रशिक्षणाचा कार्यक्रम आस्था भोजनालय, यशोदा नगर, अमरावती येथे पुर्ण झाला.
कार्यक्रमात 20 महिला प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या. USHA तर्फे आलेल्या भंडारा येथील master trainer वर्षा मते यांनी प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्षात उपयोगात येईल अशा पध्दतीने शिकवले. ते सगळ्यांना आवडले.
आणि समारोपाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून माझ्या जिवलग मैत्रिणी डॉ. मिनाक्षी व्यवहारे (Minakshi Mendhe Vyawahare) व सौ. आरती देशमुख (Aarti Deshmukh) या उपस्थित राहील्या, त्यांनीही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. व एकंदरीत हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम छान पार पडला.





आपल्या आस्था भोजनालयात जेवायला येणाऱ्या दोन युवा reporters ला आपल्या आस्था प्रकल्पाबद्दल माहिती मिळाली व त्यांना त्याबद्दल story कराविशी वाटली म्हणून त्यांनी आमची मुलाखतही घेतली. छान झाली. आम्हाला आवडली.
जमल्यास पहाल. आवडल्यास share ही कराल.
Thank you Harsh and Rohit Panvatkar.
जवळपास 1 वर्षापुर्वी आपल्या प्रकल्पात लहान मुलांची सोय होत नाही म्हणून सुनीता (आपल्या प्रकल्पातील एक निवासी) तिच्या गावी परत गेली होती. त्याचे आम्हाला त्यावेळेस खुप वाइट वाटले होते, अजूनही वाटते. आणि या वर्षभरात बाकीही बरेच अनुभव आले, हे काम करता करता आम्ही खुप काही शिकलोही. आणि या अनुभवातून अजूनही शिकतच आहोत.
पण आपल्या या प्रकल्पाचा, या कामाचा, अर्चना व तिच्या मुलीसारख्या काही जणांना फायदा झाला, होत आहे याचा आम्हाला खुप आनंद आहे.
आणि खुप जास्ती जरी नाही तरी आणखीन काही गरजू महीलांना, मुलींना, मुलांना, वृध्दांना त्यांना आवश्यकता आहे त्यावेळेस आम्ही मदत करू शकू असा आम्हाला, व आपल्या प्रकल्पातील सगळ्यांना, विश्वास आहे. आणि म्हणूनच अर्चना आपल्या प्रकल्पाबद्दल तिच्यासारख्या इतर महीलांना काही सांगू असे म्हणत आहे. जमल्यास एकाल. गरजू महीलांपर्यंत ही माहिती पोहचवाल.
आम्ही आपल्या आस्था निवासी प्रकल्पाचे व आस्था भोजनालयाचे सगळे काम व्यवस्थित होत नाही तो पर्यंत इतर कुठला नवीन कार्यक्रम सुरू करायचा नाही असे ठरवले होते / आहे. पण यादरम्यान काही संधी उपलब्ध झाल्यास त्याबद्दल विचार करून ठरवूया असेही ठरवले होते / आहे. आणि काही दिवसांपूर्वी अमरावतीमधील एका दुसर्या संस्थेमार्फत आम्हाला काही गरजू विद्यार्थ्यांना व इतर काही जणांना नियमीतपणे जेवण पुरवण्या संदर्भात मिळून काही कार्यक्रम करता येईल का अशी विचारणा झाली होती. त्यानुसार आम्ही काय करता येईल, लाभार्थ्यांची निवड कशी करता येईल, त्यांच्याकडून काय अपेक्षा असतील, अंदाजे किती खर्च होईल, इ. गोष्टींवर विचार करून एक रूपरेषा त्यांच्यासमोर मांडली. चर्चा छान झाली. पण कदाचित आम्ही काढलेला खर्च त्यांना जास्त वाटला असेल किंवा इतर काही कारण असेल पण पुढे मात्र काही ठरले झाले नाही व त्यांच्यासोबतचा हा कार्यक्रम सुरू झाला नाही.
आणि खर्चाची व्यवस्था करणे अवघड असल्यामुळे आम्हीही त्यावर पुढे फारसा विचार केला नाही. पण मनातून तो विचार गेलाही नाही. व आपल्या भोजनालयात अधूनमधून विद्यार्थी half tiffin (कमी पैशात mess) बद्दल चौकशी करत होतेच.
आणि योगायोगाने काल सकाळी उदयने आपण स्वत:च हा कार्यक्रम सुरू करूया, पण छोट्या प्रमाणात, असे सुचवले. आम्ही परत सगळा विचार केला. इतर सर्व ठीक आहे पण खर्चाची व्यवस्था करणे अजूनही अवघडच वाटत आहे. पण तरीही आम्ही 1 तारखेपासून हा कार्यक्रम सुरू करत आहोत व किमान 1 वर्ष तरी हा कार्यक्रम सुरू ठेवूया असे सध्या ठरवले आहे. व या कार्यक्रमाचा या 10 विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल व indirectly काही प्रमाणात तरी आपल्या आस्था प्रकल्पालाही फायदा होईल असे वाटत आहे. काय होते ते लवकर समजेलच.
तुम्हाला कोणाला या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, या कार्यक्रमासाठी काही मदत करायची असल्यास, आमच्याशी नक्कीच संपर्क साधाल.

काल JCI अमरावतीच्या एका कार्यक्रमात काही महीलांचा, त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्यात आला. यात आपल्या आस्था निराधार व गरजू लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पाचे व आस्था भोजनालयाचे कामामुळे माझाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रम छान झाला. JCI च्या members ला, मैत्रिणींना भेटून, त्यांच्याशी बोलून छान वाटले.
Thank you Aarti Deshmukh, Drrashmijirafe Nagalkar, Vaishali Jadhav Tai.




मला 1-2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या नवीन प्रस्तावित महिला सक्षमीकरण व लिंगभाव समानता धोरणाबद्दल वाचून त्याबद्दलच्या प्रतिक्रिया देण्याविषयी एक phone आला होता. मी त्याबद्दल वाचायचा प्रयत्न केला, पण माझ्याकडून फारस वाचलं गेल नाही, आणि वाचलं ते खुप समजलं असही नाही. पण मी विचार करत होती, उदयशी बोलत होती, की कायद्यातील तरतुदींमुळे, सरकारी धोरणांमुळे आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसांच्या, महिलांच्या, आयुष्यात काही विशेष फरक पडतो का? पडेल का?
घरा घरांमध्ये, समाजामध्ये पूर्वीपासून चालत आलेली, रूढ झालेली, जवळपास सगळ्यांनीच स्वीकारलेली, लिंग आधारीत कामाची वाटणी उदा. पैसा कोण कमवेल, स्वयंपाक कोण करेल, कपडे – भांडे कोण धुवेल, मुलांना कोण सांभाळेल, इ. सर्व एखादे नवीन सरकारी धोरण आले म्हणून बदलेल का? तर मला वाटत की नाही, हे बहुतेक तरी बदलणार नाही. पण मला वाटते की याबद्दल चर्चा झाली तर, लहान मुला – मुलींना व इतरांनाही याबद्दल जागरूक करण्यात आले तर याबद्दल काही प्रमाणात तरी बदल होतील, बदलास सुरवात होईल. आणि या नवीन प्रस्तावित धोरणात याबद्दल काही तरतुदी आहेत असे मला वाटते. जे नक्कीच स्वागतार्ह आहे.
मला तसा कधी अनुभव आला नाही पण पूर्वी, आणि काही ठिकाणी बहुतेक आजही, मुलींना – महिलांना काही संधी उपलब्ध होत नाहीत, नाकारण्यात येतात त्या सर्व संधी, उदा. शिक्षण, व्यवसाय, स्वत:च्या नावावरील मालमत्ता, स्वत: कमावलेल्या पैशाचा विनियोग, इ. सर्व संधी एखादे नवीन सरकारी धोरण आले म्हणून भेटतील का? तर मला वाटत की हो, हे होऊ शकत. याला इतरही कारण आहेतच, पण कायद्यातील तरतुदींमुळे, आरक्षणामुळे, incentives मुळे अनेक मुलींना – महिलांना या संधी मिळाल्या आहेत, व मिळतील असे मी मानते. आणि या नवीन प्रस्तावित धोरणात याबद्दलही काही तरतुदी आहेत असे मला वाटते. जे नक्कीच स्वागतार्ह आहे.
आणि लहान मुलींवर, महिलांवर, LGBTQIA व्यक्तींवर होणारे अत्याचार, बालविवाहासारखे अपराध, इ. सर्व एखादे नवीन सरकारी धोरण आले म्हणून थांबेल का? ज्या मुलींना, महिलांना, LGBTQIA व्यक्तींना संरक्षणाची, पुनर्वसन व संगोपनाची गरज आहे त्यांचे संरक्षण, पुनर्वसन व संगोपन इ. एखादे नवीन सरकारी धोरण आले म्हणून होईल का? तर मला वाटत की हो, हे होऊ शकेल. यासाठी इतर अनेक कारण व मार्ग आहेतच, पण तरीही कायद्यातील तरतुदींमुळे हे अत्याचार व अपराध काही प्रमाणात कमी होतात व होतील, आणि ज्यांना संरक्षण, पुनर्वसन व संगोपनाची आवश्यकता आहे त्यांना कायद्यातील या तरतुदींमुळे काही प्रमाणात फायदा होतो, होईल असा मला विश्वास आहे. आणि या नवीन प्रस्तावित धोरणात याबद्दलही काही तरतुदी आहेत असे मला वाटते. जे नक्कीच, आणि परत एकदा, स्वागतार्ह आहे.
पण तरी, हा प्रश्न राहतोच की या सर्व तरतुदी पुरेस्या आहेत का? या पेक्षा अधिक चांगल्या तरतुदी करता आल्या नसत्या का? या बाबतीत अजून खुप काही करायची गरज नाही का? तर याबद्दल मला असे वाटते की बहुतेक तरी तरतुदी कधीच पुरेस्या नसतात, व अपेक्षाही कधी संपत नाहीत. त्यामुळे या सर्व बाबतीत आपण सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहेच. आणि काम सुरूही आहेच.
महिला दिनाच्या शुभेच्छा.