जवळपास 1 वर्षापुर्वी आपल्या प्रकल्पात लहान मुलांची सोय होत नाही म्हणून सुनीता (आपल्या प्रकल्पातील एक निवासी) तिच्या गावी परत गेली होती. त्याचे आम्हाला त्यावेळेस खुप वाइट वाटले होते, अजूनही वाटते. आणि या वर्षभरात बाकीही बरेच अनुभव आले, हे काम करता करता आम्ही खुप काही शिकलोही. आणि या अनुभवातून अजूनही शिकतच आहोत.
पण आपल्या या प्रकल्पाचा, या कामाचा, अर्चना व तिच्या मुलीसारख्या काही जणांना फायदा झाला, होत आहे याचा आम्हाला खुप आनंद आहे.
आणि खुप जास्ती जरी नाही तरी आणखीन काही गरजू महीलांना, मुलींना, मुलांना, वृध्दांना त्यांना आवश्यकता आहे त्यावेळेस आम्ही मदत करू शकू असा आम्हाला, व आपल्या प्रकल्पातील सगळ्यांना, विश्वास आहे. आणि म्हणूनच अर्चना आपल्या प्रकल्पाबद्दल तिच्यासारख्या इतर महीलांना काही सांगू असे म्हणत आहे. जमल्यास एकाल. गरजू महीलांपर्यंत ही माहिती पोहचवाल.